My title My title
Something Different

Childrens and free time

लहान मुलं आणि मोकळा वेळ…



©प्रा. पंचशील डावकर

 (समन्वयक, बालभवन, नारी प्रबोधन मंच, लातूर)



पिअरे नावाचा एक शास्त्रज्ञ होता. लहान लहान किटकावरती त्याचे प्रयोग चालत असत. एका विशिष्ट जातीचे किडे नेहमी एका रांगेतच जात असत.

त्यांचा नेता नेहमी पुढे असे आणि बाकीचे सर्व त्याच्या मागे जात असत. माणसासारखीच त्यांचीही प्रवृत्ती असावी बहूतेक ! यावरती पिअरेने काय केलं तर,  एका गोल थाळीत नेता किडा सोडला आणि त्याच्या मागे अनुयायी किडे दहाऐक सोडून दिले.

सगळ्यांनी नेता किड्याच्या मागे गोल गोल फिरायला सुरु केलं. नेता पुढे चालतोय आणि हे मागे त्यांच्या या गोल गोल चालण्याला काही शेवट असा नव्हताच. कसा येणार?

कारण गोल रस्ता कधी संपत असतो का? ते किडे चालतच राहतात अगदी शेवटपर्यंत चालतात. पिअरे स्वतः थकला! मात्र ते किडे चालत राहीले.

थकुन मरेपर्यंत ते चालतच राहीले.  आपल्यापैकी जेंव्हा काही पालक होतात तेंव्हा, अशाच रुळलेल्या वाटेने जाणं अधिक सुरक्षित म्हणून ती वाट बहुतेकजण निवडतात.

जगभरातलं संशोधन हेच दर्शवते की, माणसाला इतरांचं अनुकरण करायला आवडतं, इतरांशी तुलना करायला आवडते आणि मग त्यातुन पहिला येण्याचा ध्यास धऱला जातो आणि आपल्या मुलांना पहिल्या नंबरचं बाळक़डू पाजणं सुरू होतं.

“सुहासिनी फोन वरुन तिच्या लहान बहिणीला सांगत होती, माझा रेवत वेदिक गणितात पहिला आलायं. पैकीच्या पैकी मार्क घेतलेत पहा. तो कधीच त्याचा नंबर चुकवत नाही.

त्याच्या शिक्षकांनी स्टार पण दिलेत. मला तर काही  वेळा त्याच्या बुध्दींचं कौतुक वाटतं.” बहिण म्हणाली, “कसा येणार नाही रेवत पहिला! तुच कधी पहिला नंबर सोडला नाहीस शिकतांना पहिला येण्याचा! मग रेवतने तर यायलाच हवं पहिलं हो की नाही…

ज्याची आई इतकी हुशार तो कसा बरं मागचा नंबर घेईल.”  म्हणजे मुल चांगलं आणि लायक ठरविण्याचे मार्क हे मोजमाप आहे. अशा पध्दतीने मुलांना एकाच साच्याच बसवायचं.

त्यांच्या आवडी निवडी त्याचे विशेष छंद यांना दुय्यम स्थान देत सगळ्यांत आपल्या मुलाचा नंबर पहिला असला पाहीजे म्हणजे, उदा. एखाद्या वर्गात तीस मुलं असतील तर त्या तीस मध्ये माझाच मुलगा पहिला आला पाहीजे.

म्हणजे बाकीची 29 लहान चिमुकली ही, दुस-या नंबरापासून पुढे केवढा मोठा हा साचा आहे एकसारखेपणाचा.

आपण माणुस आहोत आणि आपल्या वेगळ्या अस्तित्वाची ओळख म्हणजे, आपली गुणवैशिष्ठिये आहेत हे जेंव्हा आपण विसरतो तेंव्हाच आपण मुलांच्या मनाची हत्या केलेली असते.

मार्कांच्या ओझ्याखाली आपली कोवळी मुलं केंव्हाच करपुन गेलेली असतात.

बालभवनात संयम येतो त्याला खेळायला खुप आवडतं, कधी-कधी तो काहीच खेळत नाही फक्त झाडांची पाने फुले दगड माती यांचे निरिक्षण करतो.

तो म्हणाला, “मला बालभवनातून घरी जायला नाही आवडत… तेंव्हा मी विचारलं का रे? काय झालं ? त्यावरती तो म्हणाला,

घरी गेलं की, आई बाबा बोर मारतात.

होम वर्क केलंस का,

ते नाही केलं तर आई चिडते,

मी इक़डे आलो तरच मला मनासारखं राहता येतं,

खेळता येतं,

सकाळी सहा वाजल्यापासून मी बिझी असतो.

सात ते साडेबारा शाळा,

पुन्हा दुपारी अडीच ते पाच टुयशन,

ते झालं की, स्विमिंग आणि ते संपलं की,

मला खुप थकवा येतो

तर आई दुधाचा ग्लास घेऊन पुढे हजर असते.

मी आठवड्यातुन तीन दिवस स्कॅॉलरशीपचे तासही  करतो खरं, म्हणजे मला या सगळया क्लासचा कंटाळा आलायं, मला फार दमायला होतं पण मी कोणालाच सांगु शकत नाही.

म्हणून मला इथे आलं की, फार बरं वाटतं.” संयम हा त्या हजारो मुलांचा प्रतिनिधी आहे जी क्लासेसच्या ओझ्याखाली दडपली जात आहेत.

आपलं काही तरी चुकतयं कुठेतरी आपण आपल्या मुलांच्या भल्याचा विचार करतांना मार्केटसारखं वागतोय, काही तरी मार्केट मागतं म्हणून तशी उत्पादने देत आहोत का?

हे एकदा पालक म्हणून आपण तपासुन पहायला हवं. कोणत्याही पालकांची आपल्या मुलांच्या भल्यासाठीच धडप़ड चालु असते पण ती धडपड बाजारातल्या साच्यामध्ये अडकलेली आहे का?

याची एकवेळ पुर्नतपासणी करावी लागणार आहे. आपला संवाद सुध्दा मुलांशी फार बिजनेस रिलेटेड झालेला असतो.

जेवलास का?

सर्व डबा संपवलास का?

काही होम वर्क आहे का?  

आज काय होमवर्क  आहे?

मी येई पर्यंत होम वर्क कर,  कुठे जाऊ नकोस हं! घरीच रहा.  मी येतेय/ येतोयं तो पर्यंत टीव्ही पहा. बस या पलिकडे ना पालक मुलांशी बोलतात नाही मुलं पालकांशी बोलतात, झालं मुलांचा संवाद इथेचं थांबतो.

मग मुलं मोठी झाली की, ती अबोल होतात फारशी पालकांशी बोलत नाहीत. हे चित्र तयार करण्यासाठी कोण जबाबदार आहे? 

कोणीतरी काहीतरी नैसर्गिक मिळणारं नक्कीच मिस केलं आहे.

आपल्या मुलांशी आपण व्यवहार करत असतो. तो बहुतेकदा लाभ नावाच्या पायावरती उभा असतो. आता तर कोवीडच्या काळात ही परिस्थिती अत्यंत स्फोटक झालेली आहे.

पालक आणि मुलं दोघेही सहनशीलतेच्या कठड्यावरुन केंव्हाही कोसळु शकतात. सध्याच्या काळात ऑनलाईन प्रणालीमध्ये खरंच मुलं शिकतात की, त्यांच्यावरती इतरही काही साईड इफेक्ट होतात यांचं संशोधन सुरू आहे.

द हिंदु या वृत्त पत्राच्या डिसेंबर 2020 मधील सर्वेनुसार शाळा आणि पालकांसाठी मार्गदर्शन करण्यात आलयं.  त्यानुसार ऑनलाईन शाळा ह्या तीन वर्षाच्या आतील मुलांना एका तासापेक्षा जास्त नसाव्यात.

मुलांना जास्तीचा होमवर्क या काळात देऊ नये, तो कटाक्षाने टाळावा.

पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च चंढीगड मधील क्लिनिकल सायकॉलॉजीचे प्राध्यापक डॉ. आदर्श कोहली यांनी, मुलं सारखी ऑनलाईन राहिल्यामुळे त्यांच्यावरती पुढील परिणाम दिसुन येतात.

मुलांना डोळ्याचे आजार निर्माण होत आहेत, त्यांची बैठक एकाच ठिकाणी जास्तकाळ होते, सक्रियतेअभावी चिडचीड होते, कारण नसतांना मुलं त्रागा करतात, जेवण पाणी शी शु यासारख्या नैसर्गिक विधी कितीतरी काळ रोखून धरल्या जातात.

त्यामुळे मुलांची चीडचीड वाढते.  ऑनलाईनची तुलना त्यांनी भांगाच्या व्यसनाशी केली आहे. सध्याच्या काळात, मुलांचा सारखा व्यस्त दिनक्रम असेल तर त्यामुळे नैराश्य येऊ शकतं.

नखे चावणे, अंगठा चोखणे आणि केस ओढणे यांसारख्या कृतीमुळे मज्जातंतूंचा बिघाड होऊ शकतो, असं निरिक्षण त्यांनी नोंदवलयं.

याच बरोबरीला जगभरातील मुलांच्या संगोपनातील झालेल्या अभ्यासानुसार मुलांना अतिनियोजीत दिनक्रम दिला गेला तर त्यांना अनेक आजार जडतात, त्यांची रंजनाची वेळ कमी झाल्याने, मुलांच्या उत्साहात घट होते.

मुलं स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायला कमी पडतात कारण असते, सतत इतरांनी दिलेलं त्यांचं शेड्युल्ड, ते प्रचंड़ कंटाळा आणणारं ठरतं, झोपमोड होते कितीही झोपलं तरी मुलांना, झोप अपुरी झाल्यासारखं वाटतं.

एका वेळेला तर मुल सगळया गोष्टींना नकार देतं. ही परिस्थिती अगदी सगळ्यांच्या घरी सारखी असेल असं अजिबात नाही.

काही सजग पालकांनी ठरवलयं आपल्या मुलांना ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन शिक्षण जेंव्हा सुरू होईल तेंव्हा ते देऊयात त्यांनी मुद्दाम हा मार्ग स्विकारलायं. घरी जेवढं मुलं करतील तेवढं ठिक, अशी त्या मागील समज आहे.

मुलं नक्कीच महत्वाकांक्षी झाली पाहीजेत पण ती पालकांच्या महत्वाकांक्षाचे वाहक होता कामा नयेत म्हणून मुलांशी संवाद करतांना ते नेहमी गुंतलेले असले पाहीजेत, याची जर आपण सारखी चौकशी करत राहीलो तर त्यांचा मोकळा वेळ आपण खाऊन टाकतोय ही केवढी मोठी हिंसा आहे.

त्यांना जरा तरी उत्संत मिळू देणं त्यांचं रंजन करु देता येणं हा मुलांचा हक्क आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने जगातील सर्व सदस्य राष्ट्रांना मुलांच्या संगोपणात त्यांना त्यांची रंजक वेळ देण हा त्यांचा मुलभूत हक्क सांगितला आहे.

लहान मुलांचे व्यक्तिमत्त्व हळूहळू घडत असते. ती आजूबाजूचे निरीक्षण करून शिकत असतात. या वयात त्यांना सतत कशात ना कशात गुंतविण्याऐवजी त्यांना स्वत:चा मोकळा वेळ द्या. मुलांच्या जडणघडणीसाठी ती अत्यंत आवश्यक गोष्ट आहे.



©प्रा. पंचशील डावकर

 (समन्वयक, बालभवन, नारी प्रबोधन मंच, लातूर)

Mob- 9960001617



लहान मुलं आणि मोकळा वेळ…



Children’s reggae and their brotherhood(Opens in a new browser tab)

The kitchen in Marathi(Opens in a new browser tab)

High income Startup:- Councelling and Guidance in Marathi(Opens in a new browser tab)



Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.

All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button